Skip to main content

प्रवेश कसा घ्यावा? डिप्लोमा इन इंजिनिअरींग

 


प्रवेश कसा घ्यावा?

डिप्लोमा इन इंजिनिअरींग – तंत्रनिकेतन

मधुकर घायदार, 9623237135

·         उदिष्टे : पारंपारिक शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे इंजिनिअरींग डिप्लोमा (पदविका) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सद्या वाढत आहे. कुशल इंजिनीअर तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे तंत्रनिकेतनचे उदिष्ट.

·         व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खासगी तंत्रनिकेतने आहेत. राज्यात एकूण तीनशे अठ्ठ्यात्तर शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतने आहेत. यात सुमारे 4० प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 17 हजार 759 तर खासगी तंत्रनिकेतनमध्ये 90 हजार 282 जागा उपलब्ध आहेत. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी 387 तंत्रनिकेतनमध्ये 82 हजार 275 जागा उपलब्ध आहेत.

·         शैक्षणिक अर्हता : 35 टक्के गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदविकेच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळतो. इयत्ता बारावी विज्ञान/टेक्निकल/व्होकेशनल विषय घेऊन उत्तीर्ण झाल्यास किंवा दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.

·         कालावधी : पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा असून पदविकानंतर सीईटी/जेईई यासारखी कोणतीही प्रवेश परीक्षा न देता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी शाखेत (इंजिनिअरिंग पदवी) प्रवेश घेता येतो.  

·         आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, द्वितीय वर्षात प्रवेश घ्यायचा असल्यास बारावी/आयटीआयची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी.

·         उपलब्ध अभ्यासक्रम : तंत्रनिकेतनमधील सर्व अभ्यासक्रम तीन वर्षांचे आहेत. त्यात स्थापत्य, यंत्र, विद्युत, संगणक, अणुविद्युत, माहिती तंत्रज्ञान, रसायन, खनिकर्म, वस्त्रनिर्माण, ड्रेस डिझायनिंग, उत्पादन, प्रिंटींग, उपकरणीकरण आदींसारखे सुमारे 40 प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

·         आरक्षण व सुविधा : पदविका अभ्यासक्रमांत सरकारी नियमाप्रमाणे प्रत्येक प्रवर्गासाठी तसेच  मुलींना 3० टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे. तसेच माध्यमिक शाळेतच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदविकाच्या सर्व अभ्यासक्रमांत 15 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीना प्रवर्गानुसार वार्षिक वसतिगृह निर्वाह भत्ता 8००० ते 30000 रुपये असतो. एस टी सवलत पास, वैद्यकीय सुविधा, आदी. देण्यात येतो. https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केल्यास अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 25000 रुपये शिष्यवृत्ती मिळते.

·         प्रवेश प्रक्रिया व संकेतस्थळ : राज्यातील पदविका प्रवेशासाठी शासनामार्फत ऑनलाईन सामायिक प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक तंत्रनिकेतनसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसते. शासकीय/खासगी तंत्रनिकेतनची यादी आणि अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक पात्रता, इतर नियम  www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर दहावी निकालानंतर उपलब्ध असते.

·         तंत्रनिकेतन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग प्रवेश माहितीपुस्तिका : CLICK HERE इथे क्लिक करा 

यावर उपलब्ध आहे.

·         संधी व फायदे : सरकारी किंवा खासगी क्षेत्रात कनिष्ठ अभियंता/निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते. किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. अभियंता पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यास खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध आहे. तंत्रनिकेतनमधील कँपस इंटरव्हूच्या माध्यमांतून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सरासरी वार्षिक पाच ते आठ लाख रुपये विदेशात पगार दिला जातो. मुंबई, पुणे, नाशिक येथील कंपन्यांमध्ये अनुभवानुसार प्रतिमाह पंधरा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

   मधुकर घायदार, नाशिक 9623237135

   










Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...