Skip to main content

साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 डिसेंबर 2023

 



साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 डिसेंबर 2023

संपादकीय... 

... आणि कष्टाचे संपत नाही...!


देशाला स्वातंत्र्य मिळाले. विकास झाला पण समस्या मात्र त्याच राहिल्या. आज आपला देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला तरी रोज कित्येक लोकं मात्र उपाशीपोटी झोपतात. देशात उद्योग धंदे वाढले तरी कुशल कामगारांअभावी बेकारी वाढतच आहे. आजही देशात सुमारे ४२ टक्के लोकं दारिद्र्य रेषेखाली आहेत.

वाढती लोकसंख्या, महागाई, दर्जेदार शिक्षणाचा अभाव, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव, घसरलेली गुणवत्ता, व्यवसाय शिक्षणाचा सुमार दर्जा, शैक्षणिक  गुणवत्ता, नीतिमत्ता, पुरेसे काम न करता आयता पगार मिळविणारी वृत्ती, कष्ट न करता शॉर्टकट मार्गाने पैसे कमविण्याची तरुणांची मानसिकता, सर्व विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार, मुल्यांपेक्षा व्यक्ती पूजेस आलेले महत्त्व अशा अनेक कारणांमुळे भ्रष्टाचारच जणू शिष्टाचार झाला आहे. 

दुर्दैव म्हणजे, आता या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा मिळाली नाहीत तरीही हे असेच चालायचे! असे मान्य करून घेणारा समाधानी समाज सभोवती तयार झाला आहे.

समाजात चैनीचे जीवन जगण्यासाठी जास्त पैशाची गरज पडू लागली अन् ते मिळविण्यासाठी विविध मार्गांचा शोध लागला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यास मूर्ख ठरविले गेले. आपले कर्तव्य असतांनाही त्याच कामाचे पैसे मागितले जाऊ लागले. समाजात पाच अंकी पगार घेणारा व्यक्ती जेव्हा पाचशे रुपये रोज कमावणाऱ्या व्यक्तीकडून पाचशे रुपये लाच घेतो. तेथेच माणुसकी संपली. सर्वसाधारणपणे व्यवस्थेपुढे हतबल होऊन पैशाची देवाण घेवाण होते. भ्रष्टाचाराला बळी पडतो तो अशिक्षित, गरीब, मध्यमवर्गीय बिचारा समाज. जिथे कुंपणच शेत खातं तिथे तक्रार करायची कुणाकडे? हा यक्ष प्रश्न त्याच्यापुढे उभा राहतो.

शेवटी एकच म्हणावेसे वाटते... हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही... कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही...!


साप्ताहिक शिक्षक ध्येय 18 डिसेंबर 2023

अंक वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...