Skip to main content

शिक्षक ध्येय २५ जुलै २०२२ - स्पर्धा विशेषांक

 



संपादकीय...

 

 

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

         

“मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही...”

-   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 

स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीच्या जोरावर टिळकांनी राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा विचार सांगून तो कृतीत आणला.

विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळकांनी 1 जानेवारी 1880  रोजी 'न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. 1884 मध्ये त्यांनी आगरकरांसोबत 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली.
याच संस्थेमार्फत 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली.
यात ते गणित आणि संस्कृत विषय शिकवित.

जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करून सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी 1881 साली मराठी भाषेतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' हे वृत्तपत्रे सुरु केली. 1882 साली भारतातील सर्वाधिक खप असलेले 'केसरी' हे वर्तमानपत्र होते. त्यातील टिळकांचे 'अग्रलेख' हा केसरीचा आत्मा होता. 1881 ते 1920 या काळात त्यांनी 514 झणझणीत अग्रलेख लिहले. 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा खणखणीत अग्रलेख लिहिण्याचे धाडस केले ते टिळकांनीच.

गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव याद्वारे त्यांनी लोकांना संघटित केले.

तन, मन आणि धन अर्पण करून या थोर 'शिक्षका'ने देशसेवा केली.

1 ऑगस्ट 1920 पर्यंत आपल्या प्रत्येक कृतीतून अंतिम श्वासापर्यंत देशसेवेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या 'ध्येयवादी' थोर राष्ट्रभक्ताला आमचे विनम्र अभिवादन!

अंक वाचण्यासाठी वरील मुखपृष्ठावर - COVER PHOTO - वर क्लिक, स्पर्श करावा..

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...