Skip to main content

शिक्षण म्हणजे काय?

 



संपादकीय

शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे आदर्श नागरिक घडणं, संकुचितपणा, स्वार्थीपणा नष्ट होणं, जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन, समाजाशी जोडलं जाणं, पर्यावरण समजणं, चांगले - वाईटाचे ज्ञान होणं, कष्ट करण्याची तयारी निर्माण होणं म्हणजेच खरं शिक्षण! हे सर्व म्हणजे शिक्षण असेल तर हे सर्व कुठं मिळतं आहे आपल्या मुलांना?

मुलं शिकण्यासाठी शाळेत जातात, शिकतात कारण ती या जगात नवी असतात. जग समजून घेण्यासाठी ते शाळेत जातात. खरं तर शिकण्यासाठी ना शिक्षेची गरज, ना बक्षिसाची. मुलांना त्यांचे कुतूहल शमविणारं शिक्षण पाहिजे असतं.

शिक्षण आनंददायी असावं, त्याचं ओझं वाटू नये, ते मुलांवर लादलं जाऊ नये, मुलांना आवडावं, त्यांचे कुतूहल जागृत व्हावं, भविष्यासाठी उपयोगी पडावं, जीवनाचा मार्ग सुकर करणारं शिक्षण हवं, कारण मानवाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणावरच अवलंबून आहे. माणूस आणि पशु यांमधील अंतर ओळखायचं साधन म्हणजे शिक्षण होय.

आजकाल शिक्षण म्हणजे शाळेत जाणे, शिक्षकांचे शिकविणे, पुस्तके वाचणे, परीक्षा देणे, उत्तीर्ण होणे झाले शिक्षण! खरं तर शिक्षण म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत सुरु असणारी निरंतर प्रक्रिया आहे.

शिक्षण ही एक अशी संपत्ती आहे, जी कोणी चोरु शकत नाही, जी दुसऱ्याला दिल्यावर कमी होत नाही तर तिच्यात वाढच होते आणि शिक्षण ही अशी भेट आहे जी देणाराही परत घेऊ शकत नाही.

स्वत:ला घडविण्यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हायला हवा पण शिक्षणात काय साधन आहे आणि काय साध्य आहे या गोंधळात आज शिक्षणाचे 'ध्येय' हरवले आहे. 

ज्ञानाचे भांडार, विश्वास, सदाचार, पावित्र्य, सुख, आनंद आदि सगळ्या शब्दांचा पर्याय आहे 'शिक्षक'. शिक्षकाचे खरे भांडवल असते नैतिकता आणि चारित्र्य. हे ज्याच्याकडे आहे अशा शिक्षकाचे जीवन नक्कीच सार्थ आणि धन्य होते.

शेवटी, जर शिक्षणाने आपल्याला एवढेही समजले नाही तर शिक्षण हवे कशासाठी?...

अंक वाचण्यासाठी....

CLICK HERE



Comments

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...